शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

हसन मुश्रीफ यांचे थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान-: शेट्टी, चंद्रकांत पाटील यांच्यानंतर फडणवीस यांना घेतले अंगावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 01:07 IST

राज्य सरकारच्या पावणेचार वर्षांतील कामकाजाचा कारभार चव्हाट्यावर मांडत राष्टÑवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिले आहे.

ठळक मुद्देकारभाराचा पंचनामा

कोल्हापूर : राज्य सरकारच्या पावणेचार वर्षांतील कामकाजाचा कारभार चव्हाट्यावर मांडत राष्टÑवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिले आहे. निवडणुकीतील आश्वासनांचा फज्जा उडाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांना उपाहासात्मक ‘आऊट स्टँडिंग चीफ मिनिस्टर’ पुरस्कार देऊन राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर राज्याच्या पातळीवर अनुभवी विरोधक म्हणून दोन्ही काँग्रेसमधील नेते अधिक आक्रमक होतील, असे वाटत होते; पण तसे झाले नाही, ऊस दरासह इतर प्रश्नांबाबत राष्टÑवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांचा अपवादवगळता विरोधक फारसे आक्रमक राहिले नाहीत.

उसाची एफआरपी, साखरेचे दर आणि शेतकरी संघटनांची भूमिका यावर राज्यात पहिल्यांदा आमदार मुश्रीफ यांनीच आवाज उठवला. थेट खासदार राजू शेट्टी यांच्यासह तत्कालीन सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांना अंगावर घेतले. विरोधातील एकही आमदार सरकारच्या कारभारावर बोलत नव्हता, त्यावेळी मुश्रीफ यांनी पश्चिम महाराष्टÑात राजू शेट्टी व मंत्री चंद्रकांत पाटील यांना जखडून ठेवण्याचे काम केले. त्या रागातून मंत्री पाटील यांनी मुश्रीफ यांना अनेकवेळा खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला तरीही नोटाबंदी, कर्जमाफीसह प्रत्येक मुद्द्यावर आमदार मुश्रीफ यांनी मंत्री पाटील व पर्यायाने भाजप सरकारला सातत्याने कोंडीत पकडले.

आता त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य सरकारच्या पावणेचार वर्षांच्या कारभाराचा पंचनामा करण्यासाठी त्यांनी अभिनव आंदोलन हातात घेतले. भाजपने निवडणुकीत दिलेली आश्वासने व सध्याच्या स्थितीवर बोट ठेवत थेट सरकारला प्रश्न करत मुख्यमंत्र्यांना उपहासात्मक ‘आऊट स्टॅँडिंग चीफ मिनिस्टर’ पुरस्कार दिला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात उपहासात्मक पुरस्काराचे वितरण करून मुख्यमंत्र्यांनाच आता आव्हान दिले आहे.

नोटाबंदी, कर्जमाफी, पेट्रोल-डिझेलची दरवाढ, प्राथमिक शाळा बंद, मराठा-लिंगायत-मुस्लिम-धनगर समाज आरक्षण, राज्यातील कायदा सुव्यवस्था, विकासकामे आदींवरून सामान्य जनतेच्या मनातील प्रश्नांना हात घालून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न मुश्रीफ यांनी केला. त्यामुळे हे आंदोलन अभिनव झालेच पण तितकेच प्रभावीही होऊ शकले.आंदोलनाची राज्यभर चर्चाआमदार मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या अभिनव आंदोलनाची चर्चा संपूर्ण राज्यभर सुरू आहे. अशाप्रकारचे उपहासात्मक आंदोलन महाराष्टÑात केवळ कोल्हापुरात करून मुश्रीफ यांनी सर्व विरोधी पक्षांनी लक्ष वेधून घेतले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस